सत्य जीवनाचे

मृत्यूचे तांडव चोहीकडे

जेव्हा वाढले होते,

मोहमायेच्या दुनियेतूनी

लोक बाहेर पडले होते


हळूहळू निवळता

संकटाची ती छाया,

पुन्हा आठवू लागली

साऱ्यांना मोहमाया


पुन्हा सुरू जाहला

पैशाचा पाठलाग,

हव्यास वाढला पुन्हा

अनीतीला आली जाग


कळेचना कसे हो

आहे कशातं सुखं,

आहे हातातं लाखो

पण हजाराचे दुःख


आहे अटळ तो मृत्यू

हे सत्य जीवनाचे,

सोडूनी इथेच सारे

साऱ्यांना हो जायाचे


मोहमाया शून्य आहे

हे मनी रूजवावे,

जे जवळ आहे त्यातूनी

स्वर्गसुख अनुभवावे


रिक्त हाताने जाणारे

एक प्रेत रोज पहावे,

अहंकारी त्या मनाला

हे सत्य दाखवावे

✒ K. Satish



Comments

Popular posts from this blog

लाडक्या लेकीस वाढदिवसाच्या शुभेच्छा...

दुनियेची रीत