अश्रूंच्या थारोळ्यामध्ये पडलो होतो जेव्हा, विव्हळत होतो, तडफत होतो कुणी न होते तेव्हा सावरून मग स्वतःला मी घेतली ऊंच भरारी, कौतुक माझे करावयाला आली दुनिया सारी आयुष्यातील एक सत्य मी जवळून पाहिले आहे, माणसांची दुहेरी भूमिका मी अनुभवली आहे ऐश्वर्याच्या शिखरावर असताना होते चिकटून, अपयशाच्या खाईत पडल्यावर वागले सगळे फटकून ओळखून मग रीत जगाची बदलले मी स्वतःला, मार्ग बदलला जगण्याचा अन् खचू न दिले मनाला सुप्त गुण मग स्वतःमधले मला कळू लागले, यशप्राप्तीचे नवे सूत्र आपोआप जुळू लागले परिस्थितीने मला शिकवली या दुनियेची रीत, म्हणून आता संकटांना मी कधीच नाही भीत... ✒ K. Satish
Very Nice & Excellent Words
ReplyDeleteThanks...!!! 🙏🏻🙏🏻🙏🏻
Deleteसुंदर
ReplyDelete