शूरवीरांना मानाची वंदना

शूरवीर ते होते कणखर

संख्या त्यांची होती छोटी

जिंकली होती त्यांनी जिद्दीने

मानाची ती लढाई मोठी


आत्मसन्मानाची लढाई

लढली होती त्या वीरांनी

नव्या पर्वाची सुरूवात जाहली

होती त्यांच्या बलिदानानी


प्राणपणाने लढले होते

झुगारूनी सार्‍या बंधांना

त्यामुळेच बाबांनी हो दिली

       त्यांना मानाची ती वंदना...!!!

✒ K. Satish







Comments

Popular posts from this blog

लाडक्या लेकीस वाढदिवसाच्या शुभेच्छा...

दुनियेची रीत

सत्य जीवनाचे